शनिवार, 26 जनवरी 2013


वन्दे मातरम..!
६३ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेछ्या..!
पूज्यनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने तयार केलेल्या संविधानाला पूज्यनीय डॉ राजेंद्र प्रसाद यांनि राष्ट्रपती म्हणून भारताचे अधिकृत संविधान म्हणून २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारले ..नि  आपण लोकशाही तत्वांवर आधारित एक प्रजासत्ताक राष्ट्राची प्रभात अनुभवली..आणि सुरु झाला एका नवीन युगाचा शुभारंभ..!
ते सर्व विद्वान पंडित ज्यांनी भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी आपली बुद्धिमत्ता आणि अभ्यास पणाला लावला ....तसेच ते सर्व शहीद हुतात्मे ज्यांच्या मुळे आपण स्वतंत्र झालो..त्या सर्वाना कोटी कोटी प्रणाम..!


आज २१ व्या शतकतील तरुणाईचा घटक म्हणून
गर्वाच नाही तर माज आहे मला भारतीय असण्याचा..!
जय हिंद..

मंगलवार, 15 जनवरी 2013

आज १५ जानेवारी , भारतीय सैन्य दिन..!
भारतीय सैन्याचे देल्हि येथील पथ संचलनाचे दूरदर्शन वर थेट प्रक्षेपण बघत असताना एक विश्वास मनांमध्ये जागला...कि कितीही संकटे आलीत, भ्रष्टाचाराचे अंतर्गत कलहाचे , परकीय आक्रमणांचे वादळ घोंघावले तरीही या सिंहहृदयी सैनिकांचे सामर्थ्य आमच्या पाठीशी असताना आम्ही सुरक्षित आहोत.!
मात्र आपले जीव तळतावर घेऊन लढणाऱ्या या सैनिकांप्रती आमचे काही कर्तव्य नाहीत काय?
त्यांच्या हौतात्म्यावर आम्ही दुखी का होत नाही ? आम्हाला परकीय शत्रूंचा राग का बरे येत नाही?
काय भारतीय समाज आज एवढा आत्मकेंद्रित झालाय?
जर नसेल तर आम्हाला ते दाखवून द्यावे लागेल ...!


भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने सेवा निवृत्त , कार्यरत असणार्या सर्व सैनिकांना जय हिंद..!                                         :- ज्ञानेश्वर