बुधवार, 2 अक्टूबर 2013


भारत मातेचे दोन महान  सुपुत्र महात्मा गांधी आणि लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या  निमित्त्य कोटी कोटी प्रणाम।! त्यांच्या सारख्या महापुरुषांकडून थोडीशी प्रेरणा घेऊन आमच्या देशातील राज्यकर्त्यांनी आणि तमाम राजकीय कार्यकर्त्यांनी स्वच्छ आणि राष्ट्र्भाक्तीपूर्ण सार्वजनिक तथा वैयक्तिक आयुष्य जगावे म्हणजे आपसूकच या महापुरूषाना खरी खुरी श्रद्धांजली होइल।! 
                                                   - ज्ञानेश्वर जगन्नाथ गेटकर 

गुरुवार, 15 अगस्त 2013




धन्यवाद …धन्यवाद …धन्यवाद …!
आज मी आनंदात स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे,
आज मी मुक्तपणे मनमोकळा श्वास घेत आहे!
एक भारतीय म्हणून तुम्हा असंख्य हुतात्म्यांना धन्यवाद।!

कधी तुम्ही अहिंसेच्या मार्गाने लढलात,
कधी तुम्ही सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने  लढलात,
स्वताच्या धारोष्ण रक्ताच्या धारा वाहिलात,
भारत मातेसाठी हसत खेळत फासावर चढलात।!

नको वाटणारे असे फाळणीचे घाव झेललात,
न मिटणारे असे आप्त मृत्यूंचे व्रण बाळगलात,
कधी रानटी आक्रमक तर कधी इंग्रजांविरुध्द,
खैबर खिंड तर कधी देशाच्या आत लढलात

आज हि तुम्ही लढतच आहात,
भ्रष्टाचार, महागाई, सामाजिक विषमते विरोधात,
आज हि तुम्ही हुतात्मे होताच आहात,
कधी सीमेवर तर कधी सीमेच्या आत।!

धन्य आहे मी भारतीय आहे, भारत माझा देश आहे…। 
असंख्य हुतात्मे माझे पूर्वज आहेत,
माझ्या या स्वच्छंदी स्वतंत्र आयुष्यासाठी कारक
तुम्हा असंख्य हुतात्म्यांना धन्यवाद।!
धन्यवाद …धन्यवाद …धन्यवाद …!     -  ज्ञानेश्वर जगन्नाथ गेटकर 



                          





 वन्दे मातरम…….!
                          ६७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेछ्या …… 
                          हे स्वातंत्र्य विश्वाच्या अंतापर्यंत असेच अबाधित राहो…. !
                          जय हिन्द…ज़य भारत।!

गुरुवार, 14 मार्च 2013

दारात जरी आला आषाढ तुझ्या ओळ,
गाता न मज आला मल्हार तुझ्यासाठी,
माझेच मला काही कळेनासे होते,
घेतात कशी गीते आकार तुझ्यसाठी ।!  :- गझल सम्राट सुरेश भट 

आज गझल सम्राट सुरेश भट यांचा स्मृतिदिन।!


"जाणतेही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला,
मी येथे अमृताचे रोपटे रुजवून आलो…. " 
अश्या रीतीने मराठी साहित्याला गझल नावाचे नवीन अमृत वेळ देणाऱ्या या महान कवीस शब्द सुमननजलि।! :- ज्ञानेश्वर गेटकर 

शनिवार, 26 जनवरी 2013


वन्दे मातरम..!
६३ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेछ्या..!
पूज्यनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने तयार केलेल्या संविधानाला पूज्यनीय डॉ राजेंद्र प्रसाद यांनि राष्ट्रपती म्हणून भारताचे अधिकृत संविधान म्हणून २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारले ..नि  आपण लोकशाही तत्वांवर आधारित एक प्रजासत्ताक राष्ट्राची प्रभात अनुभवली..आणि सुरु झाला एका नवीन युगाचा शुभारंभ..!
ते सर्व विद्वान पंडित ज्यांनी भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी आपली बुद्धिमत्ता आणि अभ्यास पणाला लावला ....तसेच ते सर्व शहीद हुतात्मे ज्यांच्या मुळे आपण स्वतंत्र झालो..त्या सर्वाना कोटी कोटी प्रणाम..!


आज २१ व्या शतकतील तरुणाईचा घटक म्हणून
गर्वाच नाही तर माज आहे मला भारतीय असण्याचा..!
जय हिंद..

मंगलवार, 15 जनवरी 2013

आज १५ जानेवारी , भारतीय सैन्य दिन..!
भारतीय सैन्याचे देल्हि येथील पथ संचलनाचे दूरदर्शन वर थेट प्रक्षेपण बघत असताना एक विश्वास मनांमध्ये जागला...कि कितीही संकटे आलीत, भ्रष्टाचाराचे अंतर्गत कलहाचे , परकीय आक्रमणांचे वादळ घोंघावले तरीही या सिंहहृदयी सैनिकांचे सामर्थ्य आमच्या पाठीशी असताना आम्ही सुरक्षित आहोत.!
मात्र आपले जीव तळतावर घेऊन लढणाऱ्या या सैनिकांप्रती आमचे काही कर्तव्य नाहीत काय?
त्यांच्या हौतात्म्यावर आम्ही दुखी का होत नाही ? आम्हाला परकीय शत्रूंचा राग का बरे येत नाही?
काय भारतीय समाज आज एवढा आत्मकेंद्रित झालाय?
जर नसेल तर आम्हाला ते दाखवून द्यावे लागेल ...!


भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने सेवा निवृत्त , कार्यरत असणार्या सर्व सैनिकांना जय हिंद..!                                         :- ज्ञानेश्वर