रविवार, 11 दिसंबर 2016

दिवस-वाढीचा

"भाऊ, हैप्पी बर्थडे इन ऍडव्हान्स" इथपासून सुरु झालेल्या शुभेच्छा अजूनही संपलेल्या नाहीत..पण वाढदिवस संपून दुसरा दिवस संपत चाललाय..!
माझ्यापेक्षा वयाने, मानाने, अनुभवाने जेष्ठ श्रेष्ठ अशा व्यक्तींपासून तर वयाने छोट्या पण मला कळत नकळत बरंच काही शिकवणाऱ्या शेकडो मित्रांचे शुभेच्छा संदेश आलेत..!
कोणी कॉल करून, तर कोणी व्हाट्सअप कोणी hike तर कोणी फेसबुक चा वापर करून, शुभेच्छा दिल्यात..!
थोडाफार आऊटडेटेड झालेला टेक्स्ट एस एम एस चा सुद्धा वापर बऱ्याच जणांनी केला..!
खरं तर माझ्यावर लोकांनी एवढी माया करावी, एवढं प्रेम करावं या पात्रतेचा मी निश्चित नाही..पण तरीही एवढ्या प्रचंड अशा स्नेह वर्षावात मी भिजून गेलो..!
ह्यात असली गंमत हि आहे की आपण माझ्या गुण दोषांसकट मला स्वीकारलं(गुण नाहीच सर्व दोषच..)...
मला आपण सर्व आपलं मानून सहन करता त्यावर आर रहमान यांनी गायलेले "रहना तू" हे गाणं आठवलं त्यातील प्रसून जोशींनी लिहिलेल्या या ओळी मला खूप आवडतात
" हाथ थाम चलना हो
तो दोनो के दाये हाथ संग कैसे..
एक दाया होगा
एक बाया होगा
थाम ले
हाथ ये थाम ले
रहना तू..
है जैसा तू..
थोडा सा दर्द तू..
थोडा सा सुकू..
रहना तू है जैसा तू..
धीमा धीमा झोका
या फिर जूनु
थोडा सा रेशम..तू हमदम..
थोडा सा खुरदुरा..
कभी तू अड जाये..
कभी तू लड जाये..
तुझे चाहू जैसा है तू..!"
कदाचित तुम्ही सर्वांनी हे गाणं ऐकूनच माझ्या सारख्या अश्या आयटम ला असे सहन करायचं ठरवलं असेल..!
मी वाढदिवशी रक्तदान करतो, किंवा अजून काही छोटासा सामाजिक उपक्रम केला म्हणून कौतुक करणारे बरेच आहेत..पण यासाठी सुद्धा आपल्यापैकी अनेक जण कारणीभूत आहेत जे स्वतःच्या जीवनातून असा आदर्श घालून देतात आणि मग आमच्यासारखे व्यक्ती अश्या उपक्रमांना आपल्या आयुष्यात परिपाठ बनवतात.!
मला असली सामाजिक प्रेरणा देणाऱ्या अशा असंख्य ज्ञात अज्ञात व्यक्तींना धन्यवाद; तुमच्यामुळे मला प्रेरणा भेटली आणि माझं उगाच कौतुक..(कारण आमचं म्हणजे उगाच फ्लॅशबाजी)
हा वाढदिवस म्हणजे दिवस-वाढीचा.! माझ्या आयुष्यात आपल्या शुभेच्छा, मार्गदर्शन नित्य वाढू द्यात, जेणेकरून माझ्या वाक्तित्वाचा विकास होईल. वाढत्या वयाबरोबर वाढणाऱ्या दायित्वांना समर्थपणे पार पाडण्यासाठी आपल्या सहकार्याची, आपल्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. हे जसे वाढत जाईल तसे माझा वाढदिवस यशस्वी होत जाईल.!
हे दिवस वाढीचा आनंदी असाच होण्यासाठी आपले ऋणानुबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ द्या. हे संबंध अंतिम श्वासाच्या पार असू द्या याच विनंतीने आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आपण असेच प्रेम आशीर्वाद असू द्या; हा माझा नश्वर देह राष्टरकार्यास्तव पडावा आणि भारत मातेच्या सेवेत खारीचा वाटा मोठा व्हावा हीच सदिच्छा.!
जाता जाता अमित त्रिवेदी यांनी गायलेलं एक गाणं-"मांजा", आठवलं , स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेल्या या ओळी अप्रतिम आहेत..
चला मी ऐकतो ते गाणं..माझ स्वतःलाच बर्थडे गिफ्ट..!
"रिश्ते पंखों को हवा देंगे..
रिश्ते दर्द को दवा देंगे..
जीत कभी हार कभी
गम तो यारो दो पल के होंगे मेहमान..!
रिश्ते दहलीजें भी लाँघेंगे..
रिश्ते लहू भी तो मांगेगे..
आँसू कभी मोती कभी
जाँन भी मांगो यारो कर देंगे कुर्बान..!

रुठे ख्वाबो को मना लेंगे..
कटी पतंगो को थामेंगे..
सोयी तकदिरे जगा देंगे..
कल को अंबर भी झुका देंगे..
है जज्बा..
सुलझा लेंगे उलझे रिश्तों का मांझा..!"


धन्यवाद.!

मंगलवार, 30 अगस्त 2016

माझे गुरू-माझे सर-खरवडे सर

                           "सर! प्लीज त्याच्या ऍडमिशन साठी होकार द्या. प्लीज! चांगला मुलगा आहे, दहावीला मार्क्स चांगले आहेत. थोडा उशीर झालाय, पण आताही तुम्ही म्हटलं तर होऊ शकते.!", ने. हि. महाविद्यालय, ब्रह्मपुरीतील ज्युनिअर कॉलेज विभागातील एक प्राध्यापक आपल्या प्राचार्यांना विनंती करत होते.
रात्रीचे ०८ वाजले होते, ज्याच्यासाठी बोलणं सुरु होतं तो १५ वर्षीय मुलगा बाहेर वऱ्हांड्यात चिंताग्रस्त होऊन बसून होता. थोड्यावेळाने प्राध्यापक बाहेर आलेत आणि आनंदात त्या मुलाला म्हणाले, "उद्या सकाळी ११ वाजता सर्व कागदपत्र घेऊन प्रवेश समितीसमोर हजर राहा.!" दुसऱ्या दिवशी त्या मुलाची ऍडमिशन झाली.
                          त्या सामान्य मुलासाठी तो क्षण आयुष्य बदलवणारा ठरला. तो सर्वसामान्य मुलगा म्हणजे मी-ज्ञानेश्वर जगन्नाथराव गेटकर आणि ते प्राध्यापक म्हणजे प्रा. जयंतराव खरवडे. माझे गुरू-माझे सर-खरवडे सर.
                         तब्बल १४वर्षे लोटलीत पण तो प्रसंग अजूनही हृदयात ताजातवानाच आहे.
                          प्रा. जयंतराव खरवडे सर ने. हि. महाविद्यालयात ज्युनिअरला(म्हणजे ११-१२वी) रसायनशास्त्र (केमिस्ट्री) विषयाचे प्राध्यापक म्हणून विद्यादानाचे कार्य करतात. मला ११वी-१२वीत त्यांनीच शिकवलं. तसं माझं आणि त्यांचा संबंध 'विद्यार्थी-शिक्षक' असा ११ वी पासून झाला. त्याआधी मी लहानपणी त्यांना भाऊजीच म्हणायचो. सरांच्या सुविद्य पत्नी प्रा. सविताताई यांचं माहेर (वठे परिवार) आमच्या घराजवळच असल्याने आम्ही सर्वांना पारिवारिक नात्यांनीच हाक मारतो-'मनोजभाऊ, श्रीपाददादा, किशोर दादा आणि सविताताई.!' त्यामुळे आपसूक खरवडे सर 'भाऊजी'. माझी ऍडमिशन होईस्तोवर मी भाऊजीच म्हणायचो. पण नंतर सर म्हणायला सुरुवात केली आणि कायमचं आता सर.!
                        प्रा. खरवडे सर म्हणजे एक उत्साही पण संयमी व्यक्तिमत्व. आपल्या बोलण्याने कोणाचं मन दुखायला नको याची सतत काळजी घेणारे. म्हणजे वर्गात सुद्धा कोणाला रागवायचं असेल तर 'सौम्य' शब्दांचा प्रयोग करणारे. "काय राजाभाऊ?" असं संबोधन करत विद्यार्थ्यांना समज देणारे आमचे सर. सरांना केमिस्ट्रीचे सर्व फॉर्मुले पाठ असत. 'किटोन्स' असो की अल्डेहाईड्स', 'अमाईन्स' असो की 'ऍसिड', 'इथेन' असो की 'अल्कोहोल' सर्व रिऍक्शन्स सरांना तोंडपाठ. कधी पुस्तक उघडून सांगितलं असं आठवतच नाही एवढं त्यांची या सर्व ऑर्गॅनिक मटेरिअल्स सोबत घट्ट केमिस्ट्री जुळली होती. 'पॉलिमर चैन' असो वा 'नायलॉन' चे धागे, सर्व हायड्रोकार्बोन्स कसे गुंफायचे हे त्यांना पक्के ठाऊक. (म्हणूनच कदाचित अवतीभोवती असंख्य सज्जनांना सत्कार्यासाठी गुंफण्याचं कार्य सरांना सहज जमते.!)
                     कॉलेजमधील कोणताही कार्यक्रम असो, वक्तृत्व असो वा प्रश्नमंजुषा, किंवा 'कॉलेज डे' मधील सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायला सर स्वतः सोबत असायचे. मी कॉलेजला असतांना बऱ्याच निबंध, वक्तृत्व, वादविवाद ,प्रश्नमंजुषा स्पर्धांना बक्षिसे मिळवली, त्याचं बरेचसे श्रेय सरांना जाते.
सर आमच्या बॅचचे वर्गशिक्षक होते. त्यामुळे त्यांचं आमच्या लहान सहान हरकतींकडे बारीक लक्ष असायचं. १२ व्या वर्गात वर्गप्रमुख (सी आर) व सहप्रमुख निवडण्यासाठी लोकशाही पद्धतीने खुली निवडणूक झाली. वर्गातील १४० पेक्षा जास्त विद्यार्थी मित्रांनी त्यात मतदान केलं आणि मी सुमारे २/३ मते घेऊन वर्गप्रमुख म्हणून निवडून आलो. यामुळे आता नवीनच समीकरण तयार झाले, 'खरवडे सर-क्लासटीचर': 'ज्ञानेश्वर गेटकर-वर्गप्रमुख'. आणि हे इक्वेशन बॅलन्स ठेवण्याची माझी जबाबदारी मात्र दहा पटींनी वाढली.
                       अशातच एक वाईट प्रसंग घडला. कोणीतरी आमच्या वर्गातील फळ्यावर घाणेरडी शिवी लिहून ठेवली. याची तक्रार मुलींनी ताबडतोब खरवडे सरांना केली. सर रागारागातच वर्गात आले, सर्वांना विचारणा झाली. पण कोणीच सांगेना की हे उपद्व्याप कोणी केले. शेवटी वर्गप्रमुख नात्याने मला उभं केल्या गेलं आणि सरांनी मला म्हटलं," वर्गप्रमुख म्हणून शिस्त सांभाळणे तुझी जबाबदारी आहे. तू मला लवकरात लवकर दोषी शोधून दे ,अन्यथा मी तुमच्या बॅचला क्लास टीचर म्हणून राहणार नाही." मी घाबरलो, सर्व विद्यार्थी घाबरले. एका नालायक मुलाच्या चुकीमुळे एवढे चांगले सर आपल्याला लाभणार नाहीत याच सर्वांनाच वाईट वाटायला लागली. पण करणार काय.? खरं म्हणजे हे घाण कृत्य कोणी केलं ते कोणालाच माहिती नव्हतं.
सर वर्गातून तडक निघून गेले. मी मग चेतन-निकेतन गुंजेकार ला ताबडतोब सर्व बदमाश मुलांशी बोलून माहिती काढायला सांगितलं. मी, अनुप पचारे, रोशन जयस्वाल, पंकज धोटे आम्ही सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने याच्या मागे लागलो. काही वेळात अक्खा वर्ग आपापल्या परीने हे प्रकरण मिटवण्याच्या मागे लागला. दिवसाअंती असं कळलं की दुसऱ्या वर्गातील एका बदमाश मुलाने आमच्या वर्गात कोणी नसतांना तसं लिहिलं. पण आमची अडचण अशी होती की आम्ही हे सिद्ध करू शकत नव्हतो. शेवटी सर्वानुमते असं ठरलं की सरांची माफी मागायची आणि पुन्हा असं होणार नाही याची ग्वाही द्यायची. संध्याकाळी शिखा, प्रीती, शुभांगी, रुचिता आणि मी, सरांच्या घरी जाऊन माफी मागितली, पुन्हा असं होणार नाही हे प्रॉमिस केलं. सरांनी सुद्धा मोठ्या मनानी आम्हाला माफ केलं आणि पुन्हा शिकवायला प्रारंभ केला.
                         हे असे अनेक प्रसंग, अनेक बदमाशा आमच्या बॅचने केल्यात की ते वर्णन करायला अक्ख पुस्तक अपुरं पडेल. आम्ही आज कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनिर, कोणी शिक्षक तर कोणी व्यावसायिक आहेत, पण सरांची शिस्त, त्यांच्याविषयीचा आदर, आणि आपलेपणा विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही तसाच आहे.
                      सर अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून शिकून मोठे झाले. एवढे मोठे होऊनही सर जमिनीशी संबंध विसरले नाहीत. असंख्य गरीब विदयार्थ्यांना त्यांनी सढळहस्ते मदत केली. कितीतरी वाट चुकलेल्या मुलांना योग्य दिशा देणारं मार्गदर्शन केलं. हे सगळं करतांना कुठेही मनात मोठेपणाचा लवलेश नाही. रा. स्व. संघाच्या शाखेत शिशु-बाल स्वयंसेवकांसोबत खेळणारे, सूर्यनमस्कार सुद्धा काढणारे नगर कार्यवाह(ते पण चाळिशीपार वय असतांना) म्हणून त्यांना मी जवळून बघितलं आहे.
                       आजारी आईवडिलांची सुश्रुषा करत, त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत सेवा करणारे खरवडे सर-सविता ताई म्हणजे श्रावण बाळंच. विद्यार्थ्यांनी मातृभक्ती, पितृभक्ती सदैव करावी हा त्यांचा आग्रह असायचा; आणि त्याचा वस्तुपाठ सरांनी स्वतः घालून दिला आहे.
                       मृदू स्वभावाचे सर गोड आवाजाचे धनी आहेतच. 'कट्यार काळजात घुसली' मधील नाट्यगीते जेवढ्या तालासुरात ते गातात तेवढ्याच तालासुरात 'गझल' सुद्धा गातात. मूळचा अध्यात्मिक पिंड असल्याने भजनं तन्मयतेने गाणं सुद्धा सहज जमतं सरांना. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमधील विनोदी, ललित, वैचारिक, सामाजिक, अध्यात्मिक आदि विविध साहित्यप्रकारांचे विपुल वाचन सरांनी केलं आहे.
                         मी हॉस्पिटल ला असतांना सरांनी केलेली धावपळ असो वा सढळहस्ते केलेली मदत असो की मी आयुष्याच्या वाटेवर चुकत असतांना माझी केलेली कानउघाडणी असो, माझ्या आयुष्यावर खरवडे सरांचे अनंत उपकार आहेत. मी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून समाजकार्य करतो म्हणून चिंता व्यक्त करणारे, हक्काने समजवणारे आणि माझ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या यशाबद्दल कौतुक करणारे 'खरवडे सर' म्हणजे ईश्वराने मला दिलेला 'बहुमूल्य वरदान' होय. सरांबद्दल विस्तृत लिहायचं तर मराठी साहित्यात नवीन ग्रंथांची भर पडेल एवढं काही आहे. त्यांचे ऋण कधीच फेडणे मला जमणार नाही की त्यांच्या एवढं होणं शक्य होणार नाही. पण त्यांच्या सद्गुणांमधील एक शतांश जरी घेऊन मी आयुष्य मार्गक्रमण करू शकलो तर मला आयुष्याचे सार्थक वाटेल.
                          उद्या दि. ३१ ऑगस्ट २०१६ रोजी खरवडे सर नोकरीतून सेवानिवृत्त होत आहेत. बऱ्याच व्यक्तींना सेवानिवृत्ती नंतर आयुष्यात पोकळी जाणवते पण सरांना ते होणार नाही नाही कारण 'त्वदियाय कार्याय बद्धा कटीयं' म्हणत सामजिक कार्यात अग्रेसर असण्याची त्यांची वृत्ती. सध्या ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चंद्रपूर विभागाचे मा. संघचालक म्हणून दायित्व निर्वाहन करत आहेतच. सेवानिवृत्तीनंतरही ते अधिक जोमाने राष्टरकार्य करत राहतील यात कोणाला शंकाच नाही. सरांच्या आयुष्यात खंबीरपणे सोबत करणाऱ्या त्यांच्या पत्नी आदरणीय सविताताईना यानिमित्ताने प्रणाम. सर तुम्हाला निरामय दीर्घायुष्य लाभो आणि आम्हाला आपलं अमूल्य मार्गदर्शन निरंतर भेटत राहो हीच देवाला प्रार्थना.
     सरांचे वर्णन करतांना मला राष्ट्रकवी स्व. मैथिलीशरण गुप्त यांच्या काही ओळी आठवल्या, ज्या सरांना चपखलपणे लागू पडतात. त्या ओळी सरांना अर्पण करून ही शब्दभेट पूर्ण करतो.
                             सब तीर्थों का एक तीर्थ यह
                               हृदय पवित्र बना ले हम!
                            आओ यहा अजातशत्रु बन
                             सबको मित्र बना ले हम!
                            रेखाए प्रस्तुत है अपने
                              मन के चित्र बना ले हम!
                          सौ सौ आदर्शों को लेकर
                             एक चरित्र बना ले हम.!

सोमवार, 15 अगस्त 2016

स्वातंत्र्य भारतीयांचे

     स्वातंत्र्य आहे आम्हास जगण्याचे, मनमुराद आनंद लुटण्याचे.! 

अखंड वाहत्या नदीवर, सलग धावत्या हाय-वे वर, उधाणलेल्या समुद्रातटी 'सेल्फी' काढण्याचे स्वातंत्र्य.!
सुसाट वेगाने पळण्याचे स्वातंत्र्य.!
आपल्या प्रिय व्यक्तीला पाठीशी बसवून बाईक फिरवण्याचं स्वातंत्र्य.!
बाईकवर प्रिय व्यक्तीला बिलगून बसण्याचं स्वातंत्र्य.!
      स्वातंत्र्य आहे आम्हास मनमोकळ्या गप्पा करण्याचं.!
कट्ट्यावर बसून वाफाळलेल्या चहासह 'फकाल्या' (गोष्टी) करण्याचं स्वातंत्र्य.!
सिगरेटचा धूर काढत वाढत्या प्रदुषणावर चिंता व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य.!
समोरासमोर नसतानाही इंटरनेट ने करायच्या 'चॅटिंग' चे स्वातंत्र्य.!
तिला पटवण्यासाठी वेगळे वेगळे स्टिकर वापरण्याचं 'हाईक' चे स्वातंत्र्य.!
दुरदेशीच्या नातवंडाला गोंजारण्यासाठी 'स्काईप' च स्वातंत्र्य.!
हवं ते शेअर करण्यासाठी सोशल मीडियाच स्वातंत्र्य.!
      स्वातंत्र्य आहे आम्हास उनाड बागडण्याचं.!
दुकानांचे शटर बंद झाले की त्यावर तीन स्टंप काढून गल्ली क्रिकेट खेळण्याचं.!
मित्रांसमवेत नद्या-नाले पोहण्याचं स्वातंत्र्य.!
फुटबाल ते हॉकी आणि बॉक्सिंग पासून तर कबड्डीपर्यंत काहीही खेळण्याचं मुलींनासुद्धा स्वातंत्र्य.!
कंप्युटरच्या पत्ते, कार रेसिंग पासून मोबाईल च्या कँडी क्रश, पॉकेमोन गो पर्यंत खेळण्याचं स्वातंत्र्य.!
     स्वातंत्र्य आहे आम्हास आवडत्या खेळाडूंना डोक्यावर घेण्याचं.!
सचिन ला देवत्व बहाल करण्याचं स्वातंत्र्य.!
क्रिकेटवेड्या देशात कबड्डी लीग ला गर्दी करण्याचं स्वातंत्र्य.!
ऑलिम्पिक स्पर्धकांवर टीका करून स्वतःची 'शोभा' करून घेण्याचं स्वातंत्र्य.!
आणि अशा टीकाकारांना चोख उत्तर देऊन आपल्या खेळाडूंची पाठराखण करण्याचं स्वातंत्र्य.!
     स्वातंत्र्य आहे आम्हास फॅशन करण्याचं.!
चेहरा रंगवण्यापासून तर केस रंगावण्यापर्यंत आणि ओठ रंगवण्यापासून तर मेहंदीने हात रंगावण्यापर्यंत स्वातंत्र्य.!
चित्रविचित्र टॅटूनी शरीर गोदवण्याचं स्वातंत्र्य.!
पडदा आणि बुरखा नाकारण्याचं स्वातंत्र्य.!
धर्मनिरपेक्ष देशात बुरखा घालण्याचं स्वातंत्र्य.!
     स्वातंत्र्य आहे आम्हास हवं ते बघण्याचं, हवं ते ऐकण्याचं.!
'सौभाग्यवती पती' पासून 'संत तुकाराम' मालिकांच्या माध्यमाने बघायचं टीव्हीचं स्वातंत्र्य.!
'फॅंटम' पासून ते 'रुस्तम' पर्यंत आणि 'एबीसीडी' पासून 'वायझेड' बघण्याचं सिनेमाचं स्वातंत्र्य.!
'बीबी की वाईन्स' ते 'गर्लीयापा' आणि 'स्ट्रगलर साला' पासून 'कास्टिंग कॉउच' पर्यंत वेब सिरीज बघण्याचं 'युट्यूब' चं स्वातंत्र्य.!
'मिर्ची' पासून 'सिटी' पर्यंत 'विविध भारती' ऐकण्याचं रेडिओचं स्वातंत्र्य.!
'माँ तुझे सलाम' ते 'मोह मोह के धागे' गुणगुणन्याचं संगीत स्वातंत्र्य.!
     स्वातंत्र्य आहे आम्हास माहितीचं.!
जन्मापासून मृत्यूपर्यंत, पदत्यागापासून पदग्रहणापर्यंत बातम्या देण्याचं स्वातंत्र्य.!
निष्काळजी पणाने 'वाहून गेलेला पुल' प्रकर्षाने दाखवण्याचं स्वातंत्र्य.!
'सबसे तेज' दाखवताना 'राहून गेलेली भूल' लपवण्याचं स्वातंत्र्य.!
शासकीय कार्यालयातून माहितीच्या अधिकाराचं स्वातंत्र्य.!
     स्वातंत्र्य आहे आम्हास चळवळींचे.!
अन्यायाविरोधात लढण्याचं स्वातंत्र्य.!
आरक्षणासाठी आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य.!
आरक्षणाविरोधात आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य.!
दलितांना अमानुष वागणुकीविरोधात आवाज बुलंद करण्याचं स्वातंत्र्य.!
महिलांवरील अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरण्याचं स्वातंत्र्य.!
    स्वातंत्र्य आहे आम्हास लोकशाहीचं.!
हवा तो उमेदवार, हवा तो पक्ष निवडण्याचं स्वातंत्र्य.!
कोणीच नको असल्यास नोटा दाबण्याचं स्वातंत्र्य.!
सशस्त्र क्रांतीशिवाय फक्त मताधिकाराचा प्रयोग करून प्रस्थापित राजसत्ता बदलण्याचं स्वातंत्र्य.!
स्वतःच स्वतःची वेतनवाढ क्षणांतच मंजूर करण्याचं लोकनेत्यांचं स्वातंत्र्य.!
यावर टीका करण्याचं, विनोद करण्याचं लोकांचे स्वातंत्र्य.!
पंतप्रधानांना मुद्दे, तक्रारी, संकल्पना सुचवण्याचं स्वातंत्र्य.!
    स्वातंत्र्य आहे आम्हास परदेशी जाण्याचं.!
भारतीय शिष्यवृत्तीवर विदेशात शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य.!
स्वदेशी उच्च शिक्षण घेऊन विदेशी नोकरी करण्याचं स्वातंत्र्य.!
देशाच्या सहिष्णुतेवर बोट ठेवून विदेशी निघून जाण्याच्या बाता करण्याचं स्वातंत्र्य.!
विदेशी गेल्यावर भारतातील अव्यवस्थेबद्दल खडे फोडण्याचं स्वातंत्र्य.!
विदेशात संकट उदभवल्याबरोबर मातृभूमीकडून मदतीची अपेक्षा करण्याचं स्वातंत्र्य.!
        स्वातंत्र्य आहे आम्हास एखाद्या बालकाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा.!
निराधार झालेल्या वृद्ध माता-पित्यांना आधार देण्याचं स्वातंत्र्य.!
असहाय दिव्यांगांना सन्मानपूर्वक साहाय्य करण्याचं स्वातंत्र्य.!
'धारावीतील' झोपडपट्टीपासून 'मेळघाटातील' वनवासी पाड्यांवर निस्वार्थ सेवा करण्याचं स्वातंत्र्य.!
'दहशतग्रस्त' काश्मीरपासून ते 'नक्षलग्रस्त' गडचिरोलीपर्यंत जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याचं स्वातंत्र्य.!
रक्तदान, नेत्रदान ते अवयवदान करण्याचं स्वातंत्र्य.!
अत्यल्प उत्पन्नातील वाटा गरीब विद्यार्थ्यांना देण्याचं स्वातंत्र्य.!
हतप्रभ झालेल्या शेतकऱ्याला 'नाम' होऊन नवी उमेद देण्याचं स्वातंत्र्य.!
कोणातरी अनाथांचा नाथ होत हसू फुलवून जगाचं सौंदर्य वाढवण्याचं स्वातंत्र्य.!
    स्वातंत्र्य आहे आम्हास सर्व ज्ञात- अज्ञात महापुरुषांना समरण्याचं.!
घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अनाम वीरांना वंदन करण्याचं स्वातंत्र्य.!
सामाजिक सुधारणांसाठी लढा देणाऱ्या समाजसुधारकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य.!
हजारो वर्षे परकीय आक्रमकांना पाणी पाजत 'भारत' जिवंत ठेवणाऱ्या नृसिंहांना दंडवत करण्याचं स्वातंत्र्य.!
वर्दीत राहून गर्दीचं संरक्षण करणाऱ्या सर्व जवानांना 'जय हिंद' करण्याचं स्वातंत्र्य.!
भारत परम वैभवाला नेण्याची ग्वाही देण्याचं स्वातंत्र्य.!
अशरण, अमरण तिरंगी ध्वजाला सलामी देण्याचं स्वातंत्र्य.!
भारताच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष करण्याचं स्वातंत्र्य.!
'भारत माता की जय' असे खड्या आवाजात जयघोष करण्याचं स्वातंत्र्य.!
      स्वातंत्र्य आहे आम्हास तऱ्हे तऱ्हेच स्वातंत्र्य उपभोगण्याचं.!
आपण कोणत्या स्वातंत्र्याला उपभोगतो याचा सारासार विचार करण्याचं स्वातंत्र्य.!
स्वातंत्र्याच्या कोणत्या तऱ्हेने भारत विश्वविजयी होईल हे ठरवण्याचं स्वातंत्र्य.!
विवेकी विचाराने स्वातंत्र्य अंगीकारण्याचं स्वातंत्र्य.!
आणि स्वातंत्र्य आहे सर्व भारतीयांना आवाहन करण्याचं..
            "हम मेहनत का दीप जलाकर
             नया ऊजाला करना सीखें
             देश हमे देता है सबकुछ
             हम भी तो कुछ देना सीखें.!"
                   वंदे मातरम..!


मंगलवार, 26 जनवरी 2016

राष्ट्रचक्र

        "चरखा" देखते ही कुछ क्षण मैं स्तिमित हो गया था। मन में आदर एवम कृतज्ञता के भाव एक साथ जाग उठे। मैं निजी कार्य हेतू मुंबई गया था, जिनसे मिलना था उनसे मिलने के लिये बहुत समय था। इतना वक्त कही बिताये इसलिये चर्चगेट स्थानक के बाजू में बने एक उद्यान में गया और अंदर जाते ही सबसे पहले कोई मुझे खीच ले गया तो 'चरखा'! ऊस उद्यान के प्रवेशद्वार के सम्मुख चरखे की बडी प्रतिकृती बनी हुई थी और "भारतियोंके लिये स्वतंत्रता का प्रतीक" ऐसेही मतितार्थ का शिलालेख अंग्रेजी में उसके नीचे अंकित किया गया था।
         हम सभी जानते हैं की महात्मा गांधीजी ने चरखे को देश के स्वाधीनता आंदोलन का प्रतीक बनाया था। और यह केवल स्वाधीनता का प्रतीक नही अपितु हमारी आत्मसम्मान का प्रतीक बन गया था। गांधीजी ने स्वदेशी, स्वावलंबन के माध्यम से स्वतंत्रता को प्राप्त करने का जो मन्त्र दिया था ऊस मंत्र को यथार्थ बनाने का यंत्र चरखा था।
मेरी दृष्टि में चरखा 'राष्ट्रचक्र' हैं।
         आज हम स्वतन्त्र है तथा राष्ट्र में लोकतंत्र है। डाँ बाबासाहब आंबेडकरजी ने हमारे राष्ट्र को बहुत ही अनमोल भेट दी- ' भारतीय संविधान'। २६ नवम्बर १९४९ को संविधान सभा द्वारा स्वीकृत "भारतीय संविधान" २६ जनवरी १९५० से हमारे राष्ट्र में लागू हुआ। इसी उपलक्ष में हम हर वर्ष गणतन्त्र दिन मनाते है| और गणतंत्र का अर्थ होता है भारतियों ने भारतियों के लिये भारतियों के द्वारा चलाई जा रही सरकार। ऐसी सरकार जो हम लोकतांत्रिक पध्दतिसे निर्वाचन के माध्यम से चुनते है।
          किंतु केवल भारतीय सरकार चुनना यही तक हम सीमित रहेंगे? क्या भारतीय व्यक्तियों ने भारतीय उत्पादों का प्रयोग करना यह राष्ट्रहित के लिये आवश्यक नही? क्या हम भारतियों ने हमारे राष्ट्र के युवाओं से नये उद्यमियों को उत्तेजन देना आवश्यक नही? क्या भारतीय व्यक्ति ने भारतीयता को जीवन के हर क्षेत्र में उतारना आवश्यक नही? भारतीय व्यक्तियों ने भारत में स्थापित उद्यमों को उत्तेजना देना और यहा निर्मित वस्तुओं का प्रयोग करना यह राष्ट्र के एकता, अखंडता, एवम सार्वभौमत्व के लिये आवश्यक नही?
          एक विदेशी कंपनी ने यहा आकर हमे ऊस राष्ट्र का गुलाम बनाया जिस राष्ट्र की वो कंपनी थी और उसके विरोध मे हमे स्वदेशी का प्रयोग करना पडा। क्या हम फिर से वो काला इतिहास पुनरावृत्त होने की राह देख रहे है ताकि फिर तब जाके हम फिर स्वदेशी का गुणगान गायेंगे; फिर अपनी अर्थव्यवस्था को मजबूत करने का प्रयास करेंगे।
           चरखा अर्थात चक्र! चक्र उद्योग का, प्रगति का प्रतीक है। हमारे राष्ट्र के मानबिंदू के रूप में हमने अशोकचक्र को स्थापित किया है;  हमारे तिरंगे पर अंकित किया है। अगर हमे अपने लोकतंत्र को जीवित रखना है, अपनी स्वतंत्रता को अक्षर करना है, जगत में स्वाभिमान से सर उठा के चलना है तो हमे अपनी अर्थव्यवस्था को मजबूत करना होगा। अर्थव्यवस्था को मजबूत करने हेतू हमे हमारे राष्ट्र के उद्यमियों को उत्तेजन देना होगा। उनके द्वारा निर्मित उत्पादों का प्रयोग करना होगा। तब जाके उद्योग का चक्र तेज गति से दौडेगा। हमारे सम्माननिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी ने नये उद्यम एवं नये उद्यमियोंको को उत्तेजना हेतु "स्टँड अप इंडिया-स्टार्ट अप इंडिया" की पहल की है। किंतु यह तभी सफल होगा जब हम भारतीय हमारे राष्ट्र के उद्यमियों द्वारा चलाये जा रहे उद्योगों में निर्मित उत्पादोंका के प्रयोग को प्राथमिकता देनी होंगी।
           चक्र श्रमजीवियों का प्रतीक है। हमारे राष्ट्र के पालक किसान भी बैलगाडियों के ( आज कल ट्रॅक्टर) चक्र का सहयोग लेकर ही हमारे लिये अन्न उपजाते है। उनकी खस्ता हालत को सुधारने का दायित्व हम सभी भारतियों का है। लोकतंत्र के लिये राष्ट्रहित के लिये किसान का जीवन उन्नत करना हमारा आद्य कर्तव्य है।
           चक्र हमे एक और याद दिलाता है, 'योगेश्वर श्रीकृष्ण'
श्रीकृष्ण ने एक और जहा भगवदगीता के माध्यम से कर्मयोग का सिध्दांत रखा वही दुसरी और सुदर्शन चक्र से अनीती, अन्याय से भरे दुष्टों का विनाश किया। आज यही सत्कार्य हमारे राष्ट्र के सेना के जवान एवं हमारी पोलीस करती है। इस कार्य में गुप्त रूप से कार्यरत गुप्तचरों का भी अनन्यसाधारण महत्व है क्योंकि उनकी कभी जगत को पहचान नही होती।
           आईये इस २६ जनवरी को गणतंत्र दिन का उल्हास मनाते वक्त इन सभी को विनम्र अभिवादन करे।
केवल १५ अगस्त, २६ जनवरी ऐसे दिन ही नही बल्कि वर्ष के हर दिन, हर क्षण हमे इन राष्टृपुरुषोंका स्मरण हो। उनके त्याग, तपस्या के प्रति हम सदैव कृतकृत्य हो और सदा हम गर्व से कहते रहे.." वंदे मातरम", "भारत माता की जय"
.!
"कुछ शस्त्र लिये लडे, कुछ शास्त्र लिये लडे..
सभी राष्ट्रपुरुष बडे, सबके अपने मार्ग बडे
भेद ना करना किसी में और ना आपस में लडे..
सब एक ही माँ के पुत्र, माँ भारती के लिये लडे.!"